शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

युवा पिढीने ग्रंथवाचनावर भर द्यावा: श्वेता सिंघल, सातारा ग्रंथोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 19:55 IST

सातारा : ‘ग्रंथामुळे जीवनाला नवी दिशा मिळते, विचारांची देवाण-घेवाण होते, ग्रंथ हे विचार करायला शिकवते, प्रेरणा देतात व जगण्याचे बळ देतात या ग्रंथातूनच एक चांगला माणूस घडतो,

सातारा : ‘ग्रंथामुळे जीवनाला नवी दिशा मिळते, विचारांची देवाण-घेवाण होते, ग्रंथ हे विचार करायला शिकवते, प्रेरणा देतात व जगण्याचे बळ देतात या ग्रंथातूनच एक चांगला माणूस घडतो, त्यामुळे युवा पिढीने जास्तीत जास्त ग्रंथ वाचावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत येथील अजिंक्य कॉलनी मैदानावर दि.१८ व १९ नाव्हेंबर या कालावधीत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.याचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी सिंघल यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या उद्घाटनप्रसंगी पोलिस अधीक्षक संदीप पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे, प्रा. श्रीधर साळुंखे, कवी प्रदीप कांबळे, नगरसेविका सविता फाळके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सिंघल म्हणाल्या, ‘वाचनामुळे अनेक गोष्टी आपल्याला समजायला मदत होते. मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक होय. आपली एका पुस्तकाशी मैत्री झाली तर त्याद्वारे आपणांस अनेक पुस्तकरुपी मित्र भेटतात. आपल्या आयुष्यात ग्रंथांचे, पुस्तकांचे खूप महत्त्व आहे. वाचन ही एक अशी गोष्ट आहे की, त्यामुळे आपल्या ज्ञानात सतत भरच पडत असते. एखादे प्रेरणादायी पुस्तक परत-परत वाचताना सतत आपल्याला नवा अनुभव येऊ शकतो. ज्ञानामुळेच आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. यासाठी आपण स्वत:ला सतत अद्ययावत ठेवले पाहिजे. ग्रंथ ही आयुष्यातील सर्वात अमूल्य ठेव असते.

ग्रंथांचे महत्त्व शब्दात सांगता येणार नाही. प्रत्येक कुटुंबाने एकतरी ग्रंथ विकत घेऊन तो आपल्या घरात युवकांना वाचनास द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ग्रंथ हे प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून श्रीधर साळुंखे म्हणाले, ग्रंथवाचनाने खरे जीवन जगता येते. ग्रंथाच्या सानिध्यात राहिलेला माणूस हा समाजातील चांगला माणूस म्हणून पुढे येतो. ग्रंथ वाचनाची संस्कृती वाढली पाहिजे. यामुळे चांगला समाज निर्माण होईल. ग्रंथ वाचनामुळे आत्म्याचे शुद्धीकरण होते. सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम ग्रंथ करतात. ग्रंथ हे आपले खरे मित्र असून, ग्रंथ प्रत्येकाने वाचले पाहिजेत. जिल्'ात ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती वाढली पाहिजे.’या कार्यक्रमाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. दीपक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नंदा जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास ग्रंथालय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सातारा येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल शेजारी संभाजीराव पाटणे, डॉ. राजेंद्र माने, अमित सोनावणे, सविता फाळके, श्रीधर साळुंखे.